Cheetahs return to India, भारतात चित्ता परतला, मुंबईत पण येणार?; अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता - when will cheetahs arrive in mumbai ranichi baug


राणीच्या बागेत येण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबईः भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नव्याने स्थान मिळाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही चित्ता यावे, या मागणीने उचल खाल्ली आहे. मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) आधीपासून चित्ता आणण्याची योजना हाती घेतली आहे. या प्रस्तावित चित्त्यांचे आगमन होण्यासाठी किमान अडीच वर्षे इतका कालावधी लागणे अपेक्षित आहे. केवळ निविदा रद्द झाल्याने आजवर चित्ता मुंबईत येऊ शकलेला नाही.

मुंबई महापालिकेने राणी बागेत परदेशातून वन्यजीव आणण्याची योजना २०१८मध्ये आखली होती. त्यात चित्त्यासह पांढरा सिंह, चिम्पांझी, लेमूर, लेझर फ्लेमिंगो, हिप्पो, ईमू, जग्वार आदी प्राण्यांचा समावेश आहे. त्या संदर्भातील काढण्यात आलेल्या निविदा तीन वेळा विविध कारणाने रद्द झाल्या आहेत. आता त्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याने पुढील काही वर्षांत मुंबईकरांना राणी बागेत नव्या वन्यजीवांचे वैविध्य अनुभवता येईल.

मुंबईकर आणि पर्यटकांनी गेल्या काही वर्षांत राणी बागेत नव्याने केलेल्या बदलांना चांगला प्रतिसाद दिला आहे. राणी बागेत सुट्ट्यांसह इतर वेळेतही गर्दी उसळत आहे. सध्या या बागेत वाघ, बिबळ्या, हत्ती, कोल्हे आदींसह विविध प्रकारचे वन्यजीव, पक्ष्यांचा समावेश आहे. त्यात नव्याने विविध वन्यजीवांचा समावेश करण्याची योजना आहे. त्यासंदर्भात पालिकेमार्फत तीन वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु, विविध कारणांनी त्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता, त्या संपूर्ण प्रक्रियेस पुन्हा नव्याने सुरुवात केली जाणार आहे.

शनिवारी चित्ता भारतात आल्यानंतर मुंबईतही त्याचे आगमन व्हावे, या मागणीचा पुनरूच्चार झाला आहे. राणी बागेत चित्त्यासह अन्य वन्यजीव कधी येतील, याची मुंबईकरांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे. राणी बागेत चित्ता येण्यास साधारण अडीच वर्षे लागणार असतानाच पर्यटकांसाठी पांढरा सिंहही पाहता येणार आहे. मात्र त्यास काही कालावधी लागणार असल्याचे सांगितले जाते.

राणी बागेत औरंगाबाद येथील प्राणीसंग्रहालयातून दोन वर्षांपूर्वी शक्ती आणि करिष्मा ही वाघांची जोडी दाखल झाली होती. त्यामुळे साधारण १३ वर्षांनंतर पर्यटकांना राणी बागेत वाघ पाहता आले. या जोडीला १४ नोव्हेंबर, २०२१मध्ये ‘वीरा’ या बछड्यास जन्म दिला. त्यामुळे आता चित्ता आणि सिंह येण्याची वाट पर्यटक पाहत आहेत.

विस्तार रखडला

राणी बागेचा विस्तार करण्यासाठी पहिल्या टप्प्यात जग्वार, चित्ता, रिंग टेल लेमूर, लेझर फ्लेमिंगो आणि दुसऱ्या टप्प्यात हिप्पो, ईमू आदींचा समावेश होता. ही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने विस्तार रखडला. पर्यटकांना नवनवीन सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असल्याचे राणी बागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.



Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: