vaibhav kadam suicide, जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या, पण मोहित कंबोज यांचा खळबळजनक दावा, म्हणाले... - mohit kamboj comment on jitendra awhad former boduguard vaibhav kadam ends life

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एकेकाळचे बॉडीगार्ड वैभव कदम यांनी आत्महत्या केलीये. अनंत करमुसे मारहाण प्रकरणावेळी आव्हाड यांचे बॉडीगार्ड असलेल्या मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम यांनी आयुष्य संपवलं. या प्रकरणावर भाजप नेते मोहित कंबोड यांनी खळबळजनक आरोप केलाय. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा सनसनाटी दावा कंबोज यांनी केला.करमुसे प्रकरणात चौकशीसाठी वारंवार बोलावून मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. हाच धागा पकडून मोहित कंबोज यांनी वैभव कदम माफीचा साक्षीदार होणार असल्यानेच त्यांची हत्या करण्यात आल्याचं म्हटलंय. कंबोज यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली असून गृहविभागाने यात तातडीने लक्ष घालून आव्हाड यांची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Girish Bapat : काँग्रेसकडून गड हिसकावला, भाजपच्या वाघाने २५ वर्ष कसब्यावर ‘राज’ कसं केलं?
मोहित कंबोज काय म्हणाले?

मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की वैभव कदम प्रकरणी तात्काळ एफआयआर नोंदवावा. आमचे रक्षण करणारे पोलीसच सुरक्षित नसतील किंवा त्यांना न्याय मिळत नसेल तर आम्हा जनतेचे काय होणार? असा सवालही मोहित कंबोज यांनी विचारला आहे.

एकच विनंती आहे, मी आरोपी नाही… जितेंद्र आव्हाडांच्या माजी अंगरक्षकाने आयुष्य संपवलं
हेड कॉन्स्टेबल वैभव शिवाजी कदम आज मुंबईत मृतावस्थेत सापडले. महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संरक्षणार्थ ते सेवेत होते तसेच एका प्रकरणात आरोपी आणि एका हाय प्रोफाइल प्रकरणात साक्षीदार होणार होते. इट इज अ क्लिअर कट मर्डर नॉट सुसाइड! असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय. याप्रकरणात मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी तात्काळ एफआयआर नोंदवावा, अशी मागणी करुन कदम कुटुंबियांना न्याय द्यावा, असं कंबोज म्हणाले.

वैभव कदम यांनी का आत्महत्या केली?

जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात अनंत करमुसे यांनी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली होती. या प्रकरणात काही पोलीस अंगरक्षकांसह आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना मारहाण केली होती. या प्रकरणी ६ एप्रिल रोजी करमुसे यांच्या तक्रारीनंतर वर्तकनगर पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात वैभव कदम यांचीही चौकशी सुरु होती. करमुसे प्रकरणात वारंवार चौकशीसाठी बोलावून त्रास दिला जातोय, असं कदम यांचं म्हणणं होतं. ‘पोलीस आणि मीडियाला एकच विनंती आहे, मी आरोपी नाही’ असे व्हॉट्सअप स्टेटस ठेवत कदम यांनी जीवनयात्रा संपवली.

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: