chhatrapati rajaram sugar mill election, राजाराम कारखान्याला गिळणाऱ्यांना रोखा, त्यांना धडा शिकवा, बंटी पाटलांचा महाडिकांवर हल्लाबोल - chhatrapati rajaram sugar mill election satej patil attack on amal mahadik

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा वापरून याठिकाणचा ऊस बेडकिहाळ येथील स्वतःच्या खासगी कारखान्याला नेला जातोय. ही प्रवृत्ती राजाराम साखर कारखाना गिळंकृत करू पाहत आहे. या घातक प्रवृत्तीला रोखा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता प्रचाराला रंगत आली आहे. गावोगावी प्रचार सभा सुरू झाल्या असून दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत रा. छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ कसबा बावडा येथे झाला. त्यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी वडणगे येथे सभासदांशी संवाद साधत पूर्ण ताकतीने ही निवडणूक लढवण्याचे आवाहन केले.

सभासदांच्या हितासाठी राजाराम कारखान्यांमध्ये परिवर्तन होणे गरजेचे आहे. त्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या पाठीशी राहून सत्तांतर घडवूया असे आवाहन गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी केले. शाहूवाडी तालुक्यातील कडवे येथे आयोजित प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील उपस्थित होते.

दोघेही गावचे कारभारी पण एका गोष्टीवरुन सतत संशय, घरात भांडणं, बायकोने नको ते पाऊल उचललं
शाहूवाडी तालुक्यातील शाहुवाडी, पेरीड, कडवे, कोळगाव, सोनवडे गावातील सभासदांशी संवाद साधला. कडवे येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना कर्णसिंह गायकवाड म्हणाले, राजाराम कारखान्याची ही लढाई परिवर्तनासाठी आहे. सभासदाना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या पाठीशी तालुक्यातील सभासदांनी ठामपणे उभे राहून राजाराम कारखान्यातील मक्तेदारी मोडून काढूया.

माजी जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांनी आता भाकरी फिरविण्याची गरज असल्याचे सांगितले. शाहूवाडी पंचायत समितीचे सदस्य अमरसिंह खोत, उमेश कामेरकर, अंजिनाथ पाटील, माजी नगराध्यक्ष राजू भोपळे यांनी गेल्या चार-पाच वर्षात कडवे परिसरातील एक टन ऊस देखील या कारखान्याने नेला नसल्याचे सांगितले.

गुरं घेऊन शेताकडे निघाला पण आपल्याच धुंदीत होता, रेल्वेची धडक बसली अन् जागेवर प्राण सोडले…
यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शिवाजी ढोणे पाटील, विजय खोत, विकास बेंडखळे, रणजीत बागडे, संभाजी खोत, उदयसिंह खोत, इमरान तरटे, मानसिंग खोत, सुधाकर पाटील, सुहास पाटील, विनायक कुंभार, सुभाषराव इनामदार, साजिद शेख, पांडुरंग पाटील, राजाराम पाटील, पंडितराव नलवडे, बाळासाहेब गद्रे, प्रशांत पाटील, शंकर पाटील, महादेव पाटील यांच्यासह कडवे परिसरातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: