barsu refinery, आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नकोच; बारसू रिफायनरी आंदोलक आक्रमक, भूमिकेवर ठाम - barsu refinery protest strong opposition to the local agitators we do not want this polluting project said people

राजापूर :कोकणात राजापूर, बारसू, सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेला रिफायनरी प्रकल्प सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र आजही या प्रकल्पाला काही ग्रामस्थांचा विरोध असल्याचे पाहायला मिळते आहे. ‘आम्हाला आमच्या जागा प्रकल्पासाठी द्यायच्या नाहीत’, ‘आम्हाला आमच्या जागा आहेत तशा महत्वाच्या आहेत’, ‘आम्ही लोकशाही मार्गाने शांततेने येथे आंदोलन करत होतो. तरीही आमच्या लोकांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून नेण्यात आलं. तसेच महिलांनाही जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आलं. आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नको’, अशी भूमिका या परिसरातील गणपत राऊत गणेश कोळंबेकरकर व श्रीकांत सोड्ये यांनी घेतली आहे. बारसू सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरीच्या सर्वेसाठीचे काम प्रत्यक्षात आज दुसऱ्या दिवशी सुरू करण्यात आला आहे.आम्ही या माळरानावर बसण्यासाठी उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून तंबू ठोकला होता. हा तंबूही पोलीस प्रशासनाकडून उधळून लावण्यात आला आहे. आमच्या महिलांनाही जबरदस्तीने हुसकावून लावत गाडीत बसवण्यात आलं, अशी प्रतिक्रिया या परिसरातील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. मंगळवारी सकाळी या परिसरात ठाण मांडून बसलेल्या महिलांकडूनही आमचे काय व्हायचे ते होऊ दे, पण या ठिकाणाहून आम्ही हलणार नाही अशी ठाम भूमिका घेण्यात आली होती.

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पॉर्न पाहून ८ वर्षीय मुलीवर बलात्कार, मृतदेहाचे १० तुकडे केले, बाथरूममध्ये लपवले
राजापूर बारसू सोलगाव येथे सर्वेक्षणाच्या कामाला वेग आला असून सर्वेक्षणाला लागणारे सामान घटनास्थळी दाखल झाल आहे. मात्र या सगळ्या सर्वेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात विरोध दिसून येत आहे. विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना, महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रिफायनरी सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या सामानाची वाहतूक करणाऱ्या गाड्या बारसू परिसरात दाखल झाल्या आहेत.

आज मंगळवारी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पुन्हा वाढवण्यात आला आहे. तरी या ठिकाणी वाटेतच महिला रस्त्यावरती आडव्या झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी समजावल्यानंतरही ग्रामस्थ घरी गेले नाहीत. त्यामुळे मग जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कठोर भूमिका घेण्यात आली. खारघर, पेण या परिसरातूनही पोलीस बंदोबस्त येथे दाखल झाला आहे. एकंदरीत या सगळ्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी स्वतः लक्ष ठेऊन आहेत.

करीयरच्या संधीचे आमिष दाखवले, अभिनेत्रीसह पाच जणांना दुबईच्या तुरूंगात अडकवले, दोघांना अटक
पोलिसांकडून धरपकड सुरू

सोमवारी संध्याकाळपासूनच या सगळ्या परिसरात स्थानिक ग्रामस्थ एकत्रित जमा झाले आहेत. ते येथून हलण्यास तयार नाहीत. या सगळ्या प्रकरणात काही ग्रामस्थ व विरोधक ऐकण्यास तयार नसल्याने पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आली आहे. बारसू सोलगाव परिसराला अक्षरशः पोलीस छावणीच स्वरूप आले आहे. दरम्यान, आज दुपारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत ग्रामस्थांची बैठक सुरू झाली असून ग्रामस्थांचे १० प्रतिनिधी बैठकीसाठी हजर आहेत. आता या बैठकीत चर्चेदरम्यान कोणता तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

खारघर दुर्घटनेचा प्रश्न उच्च न्यायालयात; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: